पोस्ट्स

अक्षराकडून चिन्हांकडे...

इमेज
  मानवाची निर्मिती कधी झाली हे नेमके सांगणे अर्थातच कठीण आहे.  मला नेहमी कुतूहल  वाटते की मानवाची निर्मिती झाल्यावर ते एकमेकांशी कशा पद्धतीने बोलत होते? किंवा व्यक्त होत होते?  खाणाखुणा  आणि इतरांना न्याहाळून त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून शिकणे अशा पद्धतीने त्यांचे व्यवहार चालत असावेत  का?  भाषा हा प्रकार तेव्हा नसणार, त्यामुळे कोणत्याही भाषेचे लेबल त्यांच्यावर लावता येणार नाही. परंतु मानवाचा जसजसा विकास होत गेला तशी आपापली एक भाषा / बोली  तयार झाली असे म्हणायला हरकत नाही.  सुरुवातीच्या बोलण्यामध्ये  वेगवेगळ्या शब्दांची  सरमिसळ असणार हे उघड आहे , परंतु आज जगात अस्तित्वात असलेल्या भाषा या नेमक्या ‘भाषा’ या  प्रकारात कधी घडल्या गेल्या आणि त्या भाषांचा विकास होण्याची, त्या प्रगल्भ होण्याची प्रक्रिया नेमकी कधी व कशी झाली हेही सांगणे कठीण आहे.  आपल्या मराठी भाषेबद्दल बोलायचे तर मराठीचा उगम हा पंधराशे ते चोवीसशे वर्षापूर्वीचा आहे असे मानले जाते. मात्र मराठी भाषा इसवी सनापूर्वीच अस्तित्वात होती असे म्हणणे प्रा. ह...

MAI चे पुढचे पाऊल ...“The MAI Store”

इमेज
मराठी भाषेचे शिक्षण व प्रसार, मराठी सण जपणारे व ती संस्कृती नवीन पिढीमध्ये रुजविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि  जुन्यानव्या पिढीमध्ये सुसंगती राखण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम अंमलात आणण्यासाठी त्यासाठी कोणी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टोअर सुरू करू शकते का? MAI चे उपक्रम आणि एक वस्तूंचे विक्री केंद्र याचा काय संबंध असा प्रश्न तुमच्य मनात लगेच आला असेल.  परंतु मराठी आई उपक्रमाने अतिशय योग्य वेळी हे योग्य पाऊल उचलले आहे. मराठी आई इनिशिएटव्ह काय आहे हे मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये लिहिलेच आहे. (https://panvalkar.blogspot.com/2026/02/blog-post_26.html) थोडक्यात सांगायचे तर आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या तरुणीला आधी आई झालेल्या स्त्रीने दिलेला 'आई'चा प्रेमाचा, मदतीचा हात म्हणजे मराठी आई इनिशिएटिव्ह.  सुरुवातीला आठ-दहा महिलांपुरता मर्यादित असणारा हा उपक्रम १५०० पेक्षा अधिक आयांपर्यंत पर्यंत कधी पोहोचला हे त्याच्या  दोघी सहनिर्मात्या  डॉ. सायली नातू आणि  क्षितिजा करमरकर यांना कळलेही नाही. पण एकदा ही संख्या वाढत गेल्यानंतर त्या सर्व महिलांच्...

आईची आई होताना...

इमेज
    क्षितिजा करमरकर आणि डॉ. सायली नातू   कोणत्याही सामाजिक व आर्थिक स्तरातील स्त्री असो, तिला तिच्या पहिल्या बाळाची चाहूल लागली की मनात विलक्षण आनंद आणि त्याचबरोबर बाळाची काळजी हे दोन्ही एकाच वेळेला दाटून येते. बाळ पोटात असतानाचे नऊ महिने आणि नंतर त्या बाळाचा जन्म आणि बाळाचे हळूहळू मोठे होत जाणे हा काळ  अतिशय आनंददायी असला तरी प्रत्यक्ष त्या स्त्रीला त्या सगळ्या दिव्यातून जाताना मनात अनेक प्रश्न येत असतात. त्याची उत्तरे प्रत्येकीला मिळतातच असे नाही. अशा वेळेला आई किंवा सासूबाई किंवा कोणी ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शक म्हणून असली तर फायदा होतो हे खरे असले तरी कोणी समवयस्क स्त्रीने तिचे अनुभव शेअर केले तर मनाला उभारी येते. अशीच एक उत्तर अमेरिकेत राहणारी तरुणी जेव्हा पहिल्या बाळाच्या चाहुलीने आनदित झाली, तेव्हा  सगळे काही नीट होईल ना अशा काळजीतही पडली. तिचे आई-वडील आणि सासुबाई या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्याच. परंतु तरीही पहिल्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणींनी एकत्र येऊन एकमेकींना आधार द्यावा ही कल्पना तिच्या मनात आली आणि ती...

कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (उत्तरार्ध)

इमेज
    डॉ. संजीवनी केळकर यांचं  मनोगत ग्रामीण महिलांनी चालवलेली महिलांसाठी काम करणारी महिलांची सेवाभावी नोंदणीकृत ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ही संस्था दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात १९७८पासून कार्यरत आहे. केवळ सहसंवेदनेच्या पायावर उभ्या राहिलेल्या आणि महिलांनी जिद्दीने यशस्वी केलेल्या या परिवर्तन चळवळीचा प्रवास शब्दांकित करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘देवराई’. १९७८ ते २०२५ या कालखंडात या संस्थेने आजपर्यंत केलेल्या प्रवासाचं सिंहावलोकन करण्यासाठी मी मागे वळून पाहते तेव्हा माझं मलाच नवल वाटतं. कारण या प्रवासाची वाट रुळलेली नव्हती. या वाटेवर धोक्याची वळणं होती. कधी पायाखाली रुतणारे काटे होते. कधी हिरवळही होती. कधी पावसाचा प्रसन्न शिडकावा. तर कधी मुसळधार पाऊस. कधी तप्त सूर्याचे प्रखर किरण. तर कधी क्वचित मिळणारी थंडगार सावली. याशिवाय या प्रवासाचा पल्लाही खूप लांबचा होता. हे सगळं ‘साहून’ मी कशी काय तग धरून राहिले? काय होतं माझ्याजवळ? माझं माहेर संपन्न. सुसंस्कृत आणि माणुसकी जपणारं होतं. आजही आहेच. आजही संस्थेच्या कुठल्याही कामाला गोडबोले मंडळींचं नेहमीच सहकार्य असतं....

कथा माता, बालकांच्या उत्कर्षाची... (पूर्वार्ध)

इमेज
  आपल्या देशात ग्रामीण महिला हा आजपर्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेला घटक आहे. तिच्या समस्या व त्यांवरील उपाययोजना यांवर आजपर्यंत काही परिणामकारक कार्यवाही झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर १९७८पासून या महिलांवर एक डॉक्टर म्हणून उपचार करताना त्यांच्या भावविश्वाची मला ओळख होऊ लागली. मूकपणे लाथा-बुक्क्यांचे उन्हाळे सोसत, वेदनांचे सोहळे करून, वरवर हसतमुखाने जगणाऱ्या या महिलांना जमेल तसा आधाराचा, मदतीचा हात दिल्याशिवाय मला चैन पडेना, सुखाने जगता येईना. ही टोचणी, ही अस्वस्थता प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय कमी होणार नाह याची खात्री झाली आणि महिला सबलीकरण हा शब्द अजून अस्तित्वात नव्हता, तेव्हापासून मी या समविचारी महिलांसोबत ग्रामीण महिलांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी परिवर्तन चळवळीचे काम सुरू केले. सुदैवाने या कामाला तळमळीने काम करणारे हात आणि कामाचा परीघ आपुलकीने वाढवणारे बुद्धिमान लोक मला मिळाले आणि ग्रामीण महिलांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडून येताना दिसू लागले हे स्वागतार्ह बदल नागरी समाजातील बुद्धिमंत, धोरणे ठरवणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचावेत, ग्रामीण स्त्रियांचे आयुष्...